विसरावं म्हटल तरी
विसरता येत नाही
दिवस येतात,जातात
पण मन कुठेच लागत नाही
आठवणीच्या गोड आठवणी
रंगवता मात्र येत नाही
या वाटेवरून त्या वाटेवर
पण मन मात्र कुठेच लागत नाही
पाखरान पिसं पसरली
उडता मात्र येत नाही
या फांदीवरून त्या फांदीवर
पण मन मात्र कुठेच लागत नाही
पाऊस पडून गेला तरी
आठवणीच आभाळ मोकळे होत नाही
असं कधीच झाल नाही
आठवायला विसरावं लागत ,विसरता मात्र येत नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा