शुक्रवार, १ जुलै, २०१६

अक्षर माझे


मन माझे तुझ्यापासून
दूर कधी गेलेच नाही
सतत तुझी आठवण
पण तुला कधी कळाल नाही

स्वप्नाच्या त्या धारेपासून
आठवणीचा सागर झालाच नाही
कंठ कोरडा पडत होता
पण तहान कधी लागलीच नाही

अक्षर माझे तुला सांगण्यात गुंतले
तुला ते शब्द कळलेच नाही
प्रत्येक शब्द तुझ्यासाठीच होते
पण तू ते कधी पान पाहिलेच  नाही

चातकाच्या आभासिपणाने
ढगाला दया कधी आलीच नाही
नकाराचा पाऊस पडून सुद्धा

शब्दाचे  रान कधी भेजलेच नाही 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पोशिंदा

पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...